Ad Code

Responsive Advertisement

मोदी आवास योजना म्हणजे,मोदीची फसवी योजना




मोदी आवास योजना  म्हणजे,मोदीची फसवी योजना

       भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी भारतीय जनतेला योजनेची खैरात वाटली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजिच्या हजारो योजना आहेत आणि त्या नुसत्या बिनकामाच्या योजना आहेत. उभ्या हुयातीत सामान्य माणूस त्यांच्या योजनेचा लाभ घेउच शकत नाही. अशी योजना भारताचे पंतप्रधान अमलात आणतात,तर उद्देश काय ? मोदीसाहेबांचा स्पष्ट उद्देश आहे की,मोदीने अमलात आणलेल्या योजनेचा लाभ गोर-गरीब जनतेला घेताच नाही आला पाहिजे. अशी योजना म्हणजे मोदी योजना. पंतप्रधान मोदीच्या अनेक योजना आहेत. त्यांचे नाव सांगता येणार नाही एवढ्या योजना आहेत आणि त्या योजनांची नावे स्वता मोदीसाहेबांना देखील माहीत नाहीत,एवढ्या योजना आहेत.

मोदी आवास योजना

  • मोदीची योजना आणि सामान्य माणूस
      पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान असतील की,त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जेवढ्या योजना राबविल्या तेवढ्या योजना देशातील आजपर्यंतचा एकही पंतप्रधानाने एवढ्या योजना राबविल्या नाही. पहिली योजना अमलात,आणि चहा पिऊन होणार नाही तोवर दुसरी योजना आलीच समजा,म्हणजे योजना किती असतील यांचा अंदाज न लावलेला बरा.

     पंतप्रधान नरेंद्र मोदीजि ज्या योजना राबवित आहेत त्या योजनेचा सामान्य माणसाला काहीच उपयोग होतांना दिसत नाही,नुसत्या कागदी घोडे रंगविण्याचा प्रकार आहे हा. आणि हे अगदी सत्य आहे. नरेंद्र मोदीजिच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेणारा सामान्य माणूस कागदपत्र गोळा करता करताच मरून जाईल परंतु त्या सामान्य माणसाला योजनेचा लाभ घेता येणार नाही,अश्या फसव्या योजना पंतप्रधान मोदी साहेबाच्या आहेत.

मोदी आवास योजना


  • सामान्य माणूस आहे तिथं ठीक आहे.

      पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कितीही खोट्या वल्गना करून जनतेसमोर योजनेचा पाढा वाचतील तरी पण सामान्य माणूस त्यावर विश्वास ठेवणार नाही आणि जर विश्वास ठेवलाच तर योजनेचा लाभ सामान्य माणूस घेवू शकणार नाही,इतक्या किचकट अटी मोदी साहेबांनी भारतीय जनतेवर लादल्या आहेत.

      सामान्य माणसाला योजनेची काही सोयर सुतकच नाही आहे,तो जिथं आहे तिथं सुरक्षित आहे. कारण या योजना कागदावरती आहेत आणि कागदापुरतीच मर्यादित आहेत आणि सामान्य माणसाला मोदी योजनेचा लाभ घेताच येणार नाही,म्हणून सामान्य माणूस वैतागून जाऊन खाली हाताने वापस आलेला आहे आणि सामान्य माणसाला त्या योजनेचा काहीच फायदा होतांना दिसत नाही,म्हणून सामान्य माणूस हळूचकण पण छातीठोकपणे सांगतो की,मी जिथं आहे तिथं ठीक आहे.

मोदी आवास योजना


  • मोदी आवास योजना आणि सामान्य माणूस

     पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात ज्या काही योजना राबविले त्या योजनेच्या वरचढ ठरली ति म्हणजे मोदी आवास योजना,या योजनेची संपूर्ण भारतभर चर्चा सुरू झाली आहे,म्हणजे समजून जा की,ती योजना किती महत्वाची असेल,यांचा अंदाज न वर्तवलेला बरा अशी म्हणायची वेळ आहे. देशाचे पंतप्रधानाने या योजनेचा दोन वर्षाआधीच उदो-उदो करून टाकलंय आणि ती योजना आहे,मोदी आवास योजना.


     मोदी आवास योजनेचे उद्दिष्ट खूप छान आहेत आणि योजना अधिक जोमाने राबवायला पाहिजे इतकी महत्वकांक्षी योजना आहे,कारण देशातल्या कित्येक शहरी तथा ग्रामीण विभागात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्या डोळ्यावर सावली म्हणून छत असावी आणि आवश्यकच आहे,कारण वाढत्या महागाईमुळे किंवा परीस्थितीने बेजार झालेला भारतीय माणूस स्वताच्या मिळकतीवर घर बनवू शकणार नाही आहे,म्हणून या योजनेचा लाभार्थी व्हावं असं गरीब माणसाला वाटतो,परंतु

     गोरगरीब माणसाला घर मिळूच नये,असं पंतप्रधान मोदी सहेबांची मनस्थिति आहे म्हणून ही योजना अमलात आणतांना एवढ्या जाचक अटी लादल्या गेल्या आहेत की लाभार्थी या अटीची पूर्तता कधीच करू शकणार नाही आणि मोदीसहेबांचा उद्देश स्पष्ट आहे,जो लाभार्थी योजनेतील अटीची पूर्तता करणार नाही,म्हणजे त्याला मोदी आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही,म्हणजे अर्थ सरळ आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या