गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मार्कंडेश्वराचे पुरातत्व मंदिराकडे जातीने लक्ष घातले असते तर कदाचित मार्कंडेश्वर देवस्थानची अशी अवस्था राहिली नसती. परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित पणामुळे मार्कंडेश्वराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होतांना दिसते आहे.
माहाशिवरात्री निमित्य मार्कंडा येथे मार्कंडेश्वराची खूप मोठी जत्रा भरते,अन नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि बऱ्याच जिल्ह्यामधून भाविक लोक मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात,परंतु स्वताची गैरसोय करून परत जातात आणि पुन्हा पुढच्या वर्षी दर्शनाला येतात,एवढी श्रद्धा भविकाच्या मनात ठासून भरली आहे.
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराच्या मंदिराचा विकास झाला असता,तर मंदीरा पाठोपाठ मार्कंडा गावाचा देखील विकास होतांना दिसून आला असता. मार्कंडा गावातील किंवा सभोवतालच्या परिसरातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधि उपलब्ध झाल्या असत्या. रोजगारहीन असलेल्या या परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता आणि त्या बेरोजगार युवकांचा विकासाच्या दिशेने वाटचाल करतांना दिसला असता. म्हणजे एक कदम प्रगती की ओर,हा नारा सभोवतालच्या परिसरातील गावांगावत गुंजताना दिसला असता. युवकांना रोजगाराच्या संधि उपलब्ध करून आत्मनिर्भरते कडे युवकाचा कल दिसला असता. स्वताचा रोजगार निर्माण करून कुटूंबाला हातभार लावण्यात महत्वाचा वाटा राहिला असता.रोजगारहीन युवक रिकाम्या हाताला काम नाही म्हणण्या पेक्षा स्वताच्या पायांवर उभा राहून संसाराची विस्कटलेली घडी मार्गावर आण्यात,सिंहाचा वाटेकरी होतांना दिसला असता.मार्कंडा देवस्थानाला पर्यटनाचा दर्जा मिळाला असता तर युवकाच्या कपाळावर लागलेला बेरोजगारचा कलंक पुसला जाऊन,आत्मनिर्भरते कडे युवकांची वाटचाल होतांना दिसून आली असती.
आणखी वाचा : राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे चिचडोह बॅरेज बनलाय शोभेची वस्तु
चामोर्शी तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या ८ किमी अंतरावर मार्कंडा देवस्थान असून. महत्वाचं वैशिष्ट म्हणजे वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेलं पुरातत्व देवस्थान असून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्य म्हणजे जे भाविक माहाशिवरात्रीला दर्शनासाठी येतात,त्यांची भरपूर प्रमाणात गैरसोय होत असून,कुठलीही व्यवस्था आजच्या घडीला उपलब्ध नाही,असं खेदानेच म्हणावं लागतो. म्हणून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या देवस्थानाकडे दुर्लक्ष न करता तन-मन-धनाने मन लावून योग्य नियोजन करून व्यवस्था करावी,अशी आशा परिसरातील जनता व्यकत करीत आहे.
लेखक : रमेश चौखुंडे
0 टिप्पण्या